मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)

मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)
मूळव्याधीचे प्रकार

शनिवार, ९ मे, २००९

वजन कमी करण्यासाठी मोलाच्या आयुर्वेदिक टिप्स... : - डॉ. नीता जळूकर

आयुर्वेदिक म्हटल्याबरोबर आपल्या मनात आलं असेल परिणाम हळू होत असला तरी साईड इफेक्ट नसतात''. आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्यविषयक मूलभूत सिद्धांत हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्याविषयी थोडक्यात माहीती बघूया. वजन कमी करण्यासाठी दोन महत्त्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेदविलयन करून तो शरीराबाहेर काढणे. ह्याला मेदनाशक (थर्मोजेनिक) औषधांचा (उष्मा वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो. चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. उष्णतेमुळे सहज वितळतो. अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. म्हणून मेद नाशक औषधे स्वाभाविकपणे पित्ताची वाढ करतात. त्यामुळे आपोआप भूकही वाढते. म्हणून अशा औषधांमुळे घशाशी आंबट/कडू येणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणे होऊ लागतात. शिवाय औषध घेणे बंद केल्यानंतर भूक वाढते व अन्न जास्त प्रमाणात खालणs जाते. पित्तशमनाच्या 2 टेंबलेट्स जेवणाच्या आधी घेण्यामुळे पित्त स्राव कमी होतो. भूक सौम्य होते. शिवाय उष्मा वाढविणारी म्हणजेच मेदनाशक औषधांच्या उष्ण गुणांपासून आतड्यांच्या नाजुक आवरणाचे सरंक्षण होते. ही प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी पित्तशमनच्या 2 गोळ्या जेवणाच्या आधी अर्धा तास घ्याव्यात व मेदनाशकच्या 2 गोळ्या जेवणानंतर 2 तासांच्या आत घ्याव्यात. आपला आहार-विहार हा शरीरातील सर्व घडामोडींसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे आहार-विहार आहे तसाच चालू ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल. गोड पदार्थ किंवा तळलेले/तुपकट पदार्थ टाळले पाहिजेत ही बाब अगदी लहान मुलांना पण माहीत असते. आयुर्वेदानुसार आरोग्यविषयक मूलभूत सिध्दांतांच्या आधारे काही लहान-सहान गोष्टीं अमलात आणल्dया तर परिणाम लवकर होतो व प्रकृती उत्तम राहते. ही माहिती वाचतांना आपल्याला काही गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा प्रवाहाच्या विरुध्द वाटतील, पण ह्या गोष्टी अनेक पिढ्यांच्या अनुभवातून सिद्ध झालेल्या आहेत.
1) गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग स्वत करून पहा. एक दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात काही गोड पदार्थ खा. 1-2 दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्याला नेहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल. म्हणजेच आपल्याला जेवढी खरी भूक आहे तेवढेच अन्न घेतले जाते, अनावश्यक किंवा अवाजवी अन्न घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते. जेवणानंतर पान खाण्याची पध्दत योग्यच नव्हे तर शास्त्राrय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा न घेता, जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करु नये, एवढा अर्थ नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.
2) सर्व फळांमधे कमी-जास्त प्रमाणात साखर असते. त्या साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्त्वे असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवा पायी ही जीवनसत्त्वे वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या बिया व साली फेकून देऊ नयेत.
3) चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. उष्णतेमुळे सहज वितळतो. अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन कमी करण्याची खरी इच्छा असेल तर थंड पाणी, कोल्डड्रिंक्स किंवा इतर थंड पदार्थ घेणे वर्ज्य करा.
4) वजनाच्या नियंत्रणासाठी पाणी पिण्यासंबंधी आणखीन काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. जेवणानंतर पाणी पिऊ नये, तर जेवणात मधेमधे थोड्या वेळाने पाणी पीत जावे. जास्त पाणी आरोग्यासाठी योग्य नाही. जेवणानंतर आचमन करण्याची प्रथा म्हणजेच जास्त पाणी पिण्याचा शास्त्राने सुचविलेला निषेध आहे असे समजावे. जेवणानंतर जास्त पाणी पिण्यामुळे पाचक स्राव मंद होतात, अन्नपचन बरोबर होत नाही व परिणामी मेद वाढू लागतो.
5) चहा-कॉफीसारखी साखरयुक्त पेये दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत. त्याच्या घोटा-घोटाबरोबर पोटात जाणारी साखर नकळतपणे चरबी वाढविण्यास कारण होते.
6) जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते. ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजनवाढीला व एकंदरीत रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.
7) लवकर झोपून लवकर उठावे, हा नियम आरोग्यासाठी खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते.
8) दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रुपांतर चरबीत हेते.
9) निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्यशरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जास्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.
10) बैठ्या कामामुळे मेद वाढतो. सतत कार्यक्षम राहा, सुस्ती आणि आळशीपणा टाळा. दारावरची बेल वाजली की `दुसरा कोणी उठण्याआधी आपण दार उघडण्यासाठी उठा. अशा साध्या-सोप्या सवयी अंगी बाणवल्यामुळे शारीरिक हालचाली वाढून वजन वाढण्याची सवय कमी होते.
11) दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्यासाठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहुर्ताची वाट बघू नये. सवय मोडताना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.
12) जेवण झाल्यानंतर `आता पोट भरले, आता आणखीन अन्न नको' हा संदेश मेंदूतून निर्माण होतो. पोट भरल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर हा संदेश निर्माण करण्याची यंत्रणा मेंदूतून कार्यरत होते. म्हणून साधारण प्रमाणात अन्न घेऊन झाल्यावर 10 ते 15 मिनिटे थांबून मग स्वतलाच प्रश्न विचारावा, ``अजून खरोखर भूक आहे का?'' जर उत्तर `नाही' मिळाले तर लगेच पडत्या फळाची आज्ञा समजून `बस्स' करा.
13) जास्त जेवण घेण्याची सवय चरबी काढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते.
14) `भात खाण्यामुळे वजन वाढते' असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पाणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे, पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो.
15) दिवसातून किती वेळा आहार घ्यावा ह्याविषयी अनेक मतभेद आढळतात. कोणी सांगतात `थोड्या- थोड्या वेळाने थोडा-थोडा आहार घ्यावा' तर कोणाच्या मते `ठराविक वेळी पोटभर जेवावे'. अशा वेळी काय बरोबर व काय नाही अशी शंका आपल्या मनात नक्कीच घर करून राहात असेल. अशा संभ्रमाच्या वेळी `आयुर्वेदाची शिकवण योग्य' असेच मानावे. आयुर्वेदात `याम मध्ये न भोक्तव्यं, याम युग्मं न लंघयेत्' असा श्लोक आहे. ह्याचा अर्थः- `चार तासांच्या आधी काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये.'

- डॉ. नीता जळूकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा