मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)

मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)
मूळव्याधीचे प्रकार

गुरुवार, १३ ऑगस्ट, २००९

बनावट दूध नेमके काय असते?

सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बनावट दूधाचे साठे आणि त्यासाठी लागणारे रसायने पकडण्यात आले आहे. केवळ पैशांसाठी हे दूधमाफिया लोक एकप्रकारे लोकांच्या आयुष्याशीच खेळत आहेत.
खेड्यांमध्येच या बनावट दूधाचे साठे सापडण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच गावांमध्ये सहकारी दूध उत्पादक संघांच्या माध्यमातून दूध संकलनाचे काम चालते. दूध संकलन करताना लॅक्‍टोमीटरच्या साह्याने दूधातील फॅट तपासले जाते. त्यानुसारच या दूधाचा दर्जा ठरविला जातो आणि ते विकत घेतले जाते.
मात्र ही तपासणी केवळ फॅट तपासण्यापुरतीच मर्यादित राहते. याव्यतिरिक्त इतर चाचण्या अशा दूध केंद्रांवर सहसा केल्या जात नाहीत. त्याचाच फायदा हे बनावट दूधमाफिया घेतात. त्यांचे हे बनावट दूध या फॅट चाचणीला पूरेपूर उतरते आणि कुणाच्याही नकळत चांगल्या दूधात मिसळले जाते. त्यातूनच मग सर्वसामान्य ग्राहकांच्या जीवाशी एक जीवघेणा खेळ सुरू होतो. हे बनावट दूध नक्की कसे तयार होते. त्याच्या चाचण्या कशा कराव्यात हे समजले तर आपणही नक्कीच त्याच्या दुष्परिणामापासून वाचू शकतो.

सिंथेटिक किंवा बनावट दूध हे गाई किंवा म्हशीच्या नैसर्गिक दूधासारखेच दिसत असले तरी ते काही खरे दूध नव्हे. नेहमीच्या दूधाचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यात मोठ्या प्रमाणात इतर कृत्रिम पदार्थांची भेसळ केली जाते. अशा कृत्रिम पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या दुधालाच सिंथेटिक किंवा रासायनिक दूध असेही म्हणतात. यात मुख्यत: पाणी, अतिशय बारीक केलेली डिटर्जंट पावडर किंवा साबण, सोडियम हायड्रॉक्‍साइड, खाद्यतेल, मीठ आणि युरिया यांच्या मिश्रणाचा बनावट दूधात उपयोग केला जातो.

अशा पद्धतीचे दूध तयार करण्यासाठी एका मोठ्या तोंडाच्या भांड्यामध्ये कुठल्याही प्रकारचे खाद्यतेल घेतले जाते. ते पाण्यात अशा पद्धतीने मिसळतात की त्यापासून दूधासारखे घट्ट पांढरे मिश्रण तयार होईल. तेल आणि पाणी यांचे मिश्रण होण्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या रसायनाचा वापर केला जातो. एकदा अशा पद्धतीचे घट्ट मिश्रण तयार झाले की त्यात दूधाइतका पातळपणा येईपर्यंत पुन्हा पाणी टाकतात. त्यानंतर या मिश्रणात युरिया किंवा सोडियम सल्फेट, किंवा ग्लुकोज किंवा माल्टोज किंवा कुठलेही रासायनिक खत टाकतात. मिश्रण करतेवेळी असे पदार्थ गरम पाण्यात विरघळविले जातात आणि नंतर ते दूधासारख्या घट्ट द्रावात टाकले जातात. तेलाचा वापर केल्यामुळे बनावट दूधात फॅटस्‌ तयार होतात. तर इतर पदार्थ हे रंग आणण्याच्या कामी मदत करतात. अशा पदार्थांना सॉलीड नॉट फॅट किंवा एसएनएफ असे म्हणतात. खऱ्या दूधामध्ये अशा सॉलीड नॉट फॅटचे जितके प्रमाण असते तेच प्रमाण या बनावट दूधातही राहील याची काळजी घेण्यात येते. त्यानंतर हे बनावट दूध हे खऱ्या दूधाच्या प्रमाणात मिसळले जाते.

त्यामुळे गावपातळीवरील दूधसंस्थांमध्ये जेव्हा या दूधाची लॅक्‍टोमीटरच्या साह्याने चाचणी घेतली जाते तेव्हा त्यावेळी संशयास्पद काहीच आढळत नाही आणि असे बनावट दूध सहजपणे ही चाचणी पार करून जातात.

अशा या बनावट दूधाची नैसर्गिक दूधाशी तुलना केली तर खालील फरक दिसून येतो.
१. रंगचाचणीतनैसर्गिक दूधाचा रंग पांढरा असतो तसाच बनावट दूधही पांढऱ्या रंगाचे दिसून येते
२. काही काळ साठवणूक केल्यावरही नैसर्गिक दूधाचा रंग बदलत नाही मात्र बनावट दूध फिकट पिवळ्या रंगात बदलते.
३. नैसर्गिक दूध तळहातावर चोळल्यानंतर त्याचा फेस होत नाही. मात्र बनावट दूध तळहातावर चोळल्यानंतर त्याचा फेस होतो.
४. नैसर्गिक दूधाची सामू (पी. एच. ) चाचणी केली असता तो ६.६ ते ६.८ इतका असतो. तर बनावट दूध कमालीचे अल्कलीयुक्त (अल्कलाईन) असल्याचे सामूचाचणीत दिसून येते. त्याचा सामू १० ते ११ इतका जास्त असू शकतो.
५. फॅट मात्र नैसर्गिक दूधाइतकेच बनावट दूधातही आढळून येते. नैसर्गिक दूधात फॅटचे प्रमाण ४.५ ते ५.० टक्के इतके असू शकते.
६. सॉलीड नॉट फॅट किंवा एसएनएफचे प्रमाण नैसर्गिक दूधात ८ ते ९ टक्के इतके असते तितकेच प्रमाण बनावट दूधातही राखण्याचे भान भेसळबहाद्दर पाळताना दिसतात.
७. नैसर्गिक दूध तापविले असता त्याच्या रंगात बदल होत नाही. याउलट बनावट दूध तापविल्यानंतर त्याचा रंग पिवळसर होतो.
८. नैसर्गिक दूधाची युरिया चाचणी घेतली असता त्यात फिकट पिवळा रंग आढळून येतो. तर बनावट दूध युरिया चाचणीदरम्यान गडद पिवळ्या रंगाचे होते.
यातील काही चाचण्या आपण घरीही करून बनावट दूध ओळखू शकतो.

जास्तीत जास्त पैसे कमावण्याची हावपोटी अशा प्रकारच्या बनावट दूधनिर्मितीचा आधार घेतला जातो. भारतात उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा राज्यातील काही भाग बनावट दूधनिर्मितीसाठी कुप्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे या दूधाच्या निर्मितीसाठी केवळ तीन ते चार रुपये प्रतिलिटर खर्च येतो आणि त्याची विक्री मात्र नेहमीच्या बाजारभावाने म्हणजेच २० ते २५ रुपये लिटरप्रमाणे केली जाते. यावरून बनावट दूधाचे अर्थशास्त्रही लक्षात यावे.
-http://beta.esakal.com/Blog

बुधवार, १२ ऑगस्ट, २००९

मंगळवार, ११ ऑगस्ट, २००९

टॅमिफ्लूचे अनावश्‍यक सेवन टाळा!

देशभरात विशेषत: महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचा कहर वाढला आहे. रोग नवा असल्याने आणि बहुतांश जणांना याबाबत माहिती नसल्याने अनावश्‍यक उपचारांकडे लोकांचा कल असण्याची शक्‍यता आहे. या नव्या रोगाबद्दल योग्य माहिती घेउन त्यावर उपचार करणे गरजेचे आहे, अन्यथा यातून नव्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्‍यता अधिक आहे.
स्वाइन फ्लूची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी सरसकट टॅमिफ्लू या प्रतिजैविकाचा वापर करण्याचा सल्ला सर्वच यंत्रणांकडून देण्यात येत आहे. मात्र, जपानी संशोधकांच्या मते लहान मुलांना टॅमिफ्लू देणे अत्यंत हानीकारक असून, भविष्यात या औषधाचे दुष्परिणाम म्हणून मुलांमध्ये मानसिक समस्या निर्माण होण्याची शक्‍यता अधिक आहे.
जपानी संशोधकांनी केलेल्या संशोधनातही ही बाब उघड झाली असून, टॅमिफ्लूचे सेवन केलेल्या अनुक्रमे १२ आणि १६ वर्षीय अल्पवयीन मुलांनी उडी मारल्यानंतर त्यांचे पायाला गंभीर दुखापत झाल्याचे सिद्ध झाले आहे. ही झाली सन २००६-०७ ची गोष्ट. ही माहिती न्यूसायंटिस्ट डॉट कॉम या वेबसाईटवर आहे. त्यानंतर, बसेलस्थित (स्वित्झर्लंड) रोश होल्डिंग या टॅमिफ्लूची निर्मिती करणाऱ्या जगातील एकमेव कंपनीकडून करण्यात आलेल्या खुलाश्‍यात या औषधाचे सेवन करणाऱ्यांमध्ये मानसिक आजारांची लक्षणे कमी प्रमाणात आढळल्याचा दावा करण्यात आला. फ्लू हा मुळातच मेंदू आणि मानसिक आजारांशी संबंधित विकार आहे. त्यामूळे या रोगाचे विषाणू थेट मेंदूवरच आघात करतात. मात्र टॅमिफ्लूच्या वापराने त्या विषाणूंची संख्या नियंत्रित करणे अथवा नष्ट करणे सहज शक्‍य असल्याचे मत रोशच्या टॅमिफ्लू निर्मिती विभागाचे तत्कालीन प्रमुख डेव्हिड रेड्डी यांनी व्यक्त केले होते. मात्र, २००७ मधील जपान सरकारच्या आकडेवारीनुसार टॅमिफ्लूच्या सेवनाने ५४ लोकांना जीव गमवावा लागला होता, असेही या वेबसाईटवर म्हटले आहे.
जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्‍शियस डिसीजेसचे प्रमुख संशोधक मासातो ताशिरो यांच्या मते टॅमिफ्लूच्या सेवनाने मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, तैवान आणि काही युरोपीय देशांमध्ये टॅमिफ्लूच्या वापरावर स्पष्ट निर्बंध घालण्यात आले आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये टॅमिफ्लू आणि रेलेंझा या प्रतिजैविकांमुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव रोखता येतो, मात्र, त्याचे दुष्परिणामही थांबवता येत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाला असेल तरच, टॅमिफ्लूचे सेवन करणे आवश्‍यक आहे. अनावश्‍यक भीतीपोटी किंवा कोणाच्याही दबावात न येता वैद्यकीय सल्ल्यानेच या प्रतिजैवकाची योग्य मात्रा घेणे आवश्‍यक ठरणार आहे. ई सकाळच्या एका जागरुक वाचकाने पाठविलेल्या इंग्लंडमधील डेली मेल दैनिकातील बातमीनुसार, तेथील वैद्यकीय तज्ञांनी लहान मुलांकरीता टॅमिफ्लूचे सेवन घातक असल्याने ते टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते टॅमिफ्लू या प्रतिजैविकामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव अत्यंत अल्प प्रमाणात रोखता येतो, हे जरी खरे असले तरी त्यामुळे मुलांच्या शरीरात अत्यंत जटील समस्या निर्माण होतात हेदेखील विदारक सत्य आहे. टॅमिफ्लूच्या सेवनाचा लहान मुलांच्या शरीरावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी प्रदीर्घ संशोधन करण्यात आले आहे. त्यातून वरील निष्कर्ष काढण्यात आले आहेत. याचा अर्थ मुळीच असा नाही की लहान मुलांना स्वाइन फ्लू झाला असता टॅमिफ्लू देउ नये, या लेखाचे तात्पर्य एवढेच की केवळ संशयपिशाच्चामुळे सरसकट ही गोळी न देता ती डॉक्‍टरांच्या सल्ल्याने द्यावी. इंग्लंडमध्ये करण्यात आलेल्या निरीक्षणांमध्ये टॅमिफ्लूच्या अतिरेकी सेवनामुळे लहान मुलांमध्ये सतत उलटी येणे, अस्वस्थ वाटणे आणि स्वप्नदोष या विकारांची लक्षणे दिसून आली आहेत. ऑक्‍सफोर्ड विद्यापीटातील अभ्यासक डॉ. मॅथ्यू थॉम्प्सन आणि डॉ. कार्ल हेनेगन यांच्या मते टॅमिफ्लू हे प्रतिजैविक म्हणजे स्वाइन फ्लूवरील वरदान आहे, असे मुळीच नाही. त्यांनी केलेल्या चार संशोधनांत स्वाइन फ्लू झालेल्या मुलांनी सतत घेतलेली विश्रांती आणि योग्य औषधोपचारामुळे ते इतरांच्या तुलनेत लवकर आजारमुक्त झाले.
http://beta.esakal.com

स्‍वाइन फ्ल्‍यू म्हणजे काय?



मॅक्सिकोमध्‍ये स्‍वाइन फ्ल्‍युची लागण झाल्‍याचे लक्षात आले आणि त्‍यानंतर अमेरिका, ब्रिटनसह जगभरात या रोगाचे संक्रमण वेगाने पसरू लागले आहे. या संदर्भात आरोग्य यंत्रणा सज्ज असल्‍या आणि हा रोग इतरत्र पसरू नये यासाठी प्रयत्‍न केले जात असले तरीही त्‍्याची व्‍याप्‍ती वाढत ते भारतापर्यंत आणि पुण्‍यातही येऊन पोचली आहे. दक्षता म्‍हणून जागतिक आरोग्य संघटनेने महामारी जाहीर केली आहे. शासन पातळीवरून प्रयत्‍न केले जात असले तरीही प्रत्‍यक्ष नागरिकांनीही दक्षता घेण्‍याची आवश्‍यकता आहे.

मुख्‍यतः डुकरांमध्‍ये टाईप ए एनफ्ल्‍युएन्‍जा विषाणुंच्‍या संक्रमणामुळे स्‍वाइन फ्ल्‍यूची लागण होते. या रोगाचा संबंध मुख्‍यतः श्‍वसन प्रक्रियेशी येत असल्‍याने यास श्‍वास रोग असेही काही ठिकाणी म्‍हणतात.

Tamiflu किंवा Relenza यासारखी औषधे घ्‍यावीत. मात्र या रोगापासून बचावासाठी आधीच ही औषधे अजिबात घेऊ नयेत. याशिवाय या आजारापासून बचावासाठी तुळशीच्‍या पानांचा किंवा मंजुळ्यांचा चहा घेतल्‍यास या आजाराची लागण होण्‍याची शक्यता कमी असते.
सामान्‍यतः या रोगाचा विषाणू मनुष्‍यावर प्रभावी ठरत नाही अशी धारणा होती. मात्र गेल्‍या काही वर्षांत समोर आलेल्‍या संशोधनानुसार या रोगाच्‍या विषाणुची लागण आता मनुष्‍यालाही होऊ लागली आहे. या रोगाचा फैलाव मुख्‍यत्वे वराह पालन करणारे आणि त्‍यांचे मांस विक्री किंवा भक्षण करणारे यांच्‍याद्वारे होण्‍याची दाट शक्यता असते.

अतिशय वेगाने पसरणा-या या रोगाची लक्षणे सर्वसामान्‍य फ्ल्‍यू सारखीच असतात. शिंकणे, खोकणे, संक्रमित सार्वजनिक वापराच्‍या वस्‍तूंना हाताळणे किंवा श्‍वासाद्वारेही या रोगाचा वेगाने फैलाव होऊ शकतो. 1976 मध्‍ये सर्वप्रथम या रोगाची ओळख झाली.

या रोगाची लक्षणे

सामान्‍य मानवी फ्ल्‍यू प्रमाणेच याची लक्षणे आहेत. ताप येणे, खोकला येणे, घशाला कोरड पडणे, अंग व डोकेदुखी आणि मळमळून उलट्या होणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत.

या रोगापासून बचावाचे उपाय

या रोगाची लागण आणि संसर्ग होऊ नये यासाठी नाक आणि तोंड मास्‍कने झाकून ठेवणे उत्तम. सार्वजनिक स्‍वच्‍छता गृहाच्‍या नळाचा, गाडीच्‍या दरवाज्‍याचा, सायबर कॅफेवरील माऊस किंवा कीबोर्डचा वापर केल्‍यानंतर हात साबणाने वरचेवर स्‍वच्‍छ करावेत. जर आपल्‍यात अशा प्रकारच्‍या रोगाची लक्षणे दिसत असतील. तर त्‍वरित डॉक्टरांचा सल्‍ला घेऊन घरीच थांबलेले बरे.

स्‍वाइन फ्ल्‍यू अतिसंसर्गजन्‍य आहे किंवा नाही हे अद्याप वैज्ञानिक दृष्‍ट्या सिध्‍द झाले नसले तरीही सामान्‍य फ्ल्‍यू प्रमाणे त्याचा फैलाव होत असल्‍याने त्‍याला संसर्गजन्‍य म्‍हटले जात आहे. फ्ल्‍यूचा विषाणू बाहेरील वातावरणातही बराच वेळ तग धरून राहू शकतो.

स्‍वाइन फ्ल्‍यूवर उपाय आहेत का?

होय, अशी लक्षणे दिसल्‍यास Tamiflu किंवा Relenza यासारखी औषधे घ्‍यावीत. मात्र ती घेताना त्‍यांची मुदत संप‍लेली नाही ना याची खात्री करून मगच घ्‍यावीत. मात्र या रोगापासून बचावासाठी आधीच ही औषधे अजिबात घेऊ नयेत. याशिवाय या आजारापासून बचावासाठी आयुर्वेदाने पर्याय सांगितले आहेत. त्‍यानुसार तुळशीच्‍या पानांचा किंवा मंजुळ्यांचा चहा घेतल्‍यास या आजाराची लागण होण्‍याची शक्यता कमी असते।
http://marathi।webdunia.com/
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वेळीच उपचार केल्यास ‘ स्वाइन फ्लू ’ बरा होतो. मात्र त्यासाठी लक्षणेआढळल्यावर तातडीने जवळच्या ‘ स्वाइन फ्लू ’ उपचार केंद्रावर जाणेआवश्यक आहे.

आतापर्यंत देशात पाच जणांचा ‘ स्वाइन फ्लू ’ मुळे मृत्यू झाला आहे. या सगळ्यांनाच ‘ स्वाइन फ्लू ’ ची लागण झाल्याचे लक्षात येऊन त्यांच्यावर टॅमिफ्लू गोळ्या देऊन उपचार सुरू करेपर्यंत खूप वेळ गेला. त्यामुळे नागरिकांना ‘ स्वाइन फ्लू ’ ची लक्षणे आढळल्यास लगेच ‘ स्वाइन फ्लू ’ केंद्रावर येण्याचे चाचणी करुन घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करुन घेणे आवश्यक असल्याचे ससूनच्या डॉक्टरांनी सांगितले.

‘ स्वाइन फ्लू ’ ग्रस्तांपासून किमान सहा फूट लांब असलेल्यांना आजारी पडण्याचा धोका खूप कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एन-९५ मास्क किंवा नाका-तोंडासमोर सतत रुमाल धरण्यासारखा सोपा उपाय करुनही आजारी व्यक्ती स्वतःमुळे होणारा संसर्ग टाळू शकते , अशी माहिती डॉक्टरांनी दिली. ‘ स्वाइन फ्लू ’ ग्रस्त व्यक्तीवर वेळीच टॅमिफ्लू गोळ्या देऊन उपचार केल्यास आजार नक्की बरा होतो , असेही डॉक्टर म्हणाले.

‘ स्वाइन फ्लू ’ ची लक्षणे

* सर्दी-पडसे , घसा खवखवणे , अंगदुखी , ताप या नेहमीच्या फ्लूच्या लक्षणाबरोबरच जुलाब आणि उलट्याचा त्रास होत असेल तर ‘ स्वाइन फ्लू ’ ची लागण असण्याची शक्यता असते.

* ही लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन आवश्यक ती चाचणी करून घ्यावी.

* साथीच्या रोगाच्या काळात खोकल्यातून हवेत पसरणा-या ड्रापलेट्सच्या मार्फत रोगाचा संसर्ग होतो.

उपाय :

* खोकताना तोंडावर रुमाल धरणे , सतत खोकणा-यांनी फेस मास्कचा वापर करणे.

* साथीच्या रोगांच्या कालावधीत दर दोन तासांनी कोमट पाण्याने हात धुवावेत , पाण्याची टंचाई असणा-या भागातल्या लोकांनी कोरड्या कागदाने हात पुसावेत.

* साथीच्या रोगाच्या काळात नाक , तोंड आणि डोळ्यांना वारंवार हात लावू नये , सार्वजनिक ठिकाणी जाण्याबरोबरच अनावश्यक प्रवासही टाळायला हवा.

* फ्लू झाल्यास घरगुती उपचार न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्यास प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे।

http://maharashtratimes.indiatimes.कॉम

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आजाराची लक्षणं

ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची काही लक्षण आहेत. टॅमी फ्ल्यू हे औषध एच-१ एन-१ च्या विषाणूच्या संसर्गावर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. या औषधाचा शासनाकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. तथापि, या औषधांचा वापर खात्रीशीररित्या या विषाणूंचा संसर्ग झाल्यावरच होणे आवश्यक आहे. या औषधास विषाणूंकडून प्रतिरोध निर्माण होऊ नये यासाठी शासन ही काळजी घेत आहे.

याशिवाय वैयक्तिक संरक्षक साधने (पीपीई), एन ९५, मास्क आणि सर्जिकल मास्क याचा पुरेसा साठा केंद्र शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार सर्व आंतराष्ट्रीय विमानतळावर तसेच बंदरांवर येणार्‍या परदेशी प्रवाशांची तपासणी वैद्यकीय पथकांच्या सहाय्याने सुरु आहे. [१]

आजार कसा टाळावा

आरोग्य विभागाने काय करावे आणि काय करू नये यासंबधीच्या मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. यामध्ये

1. हात नेहमी साबण-पाण्याने धुवावेत,
2. गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे,
3. स्वाईन फ्ल्यू रुग्णापासून किमान एक हात तरी दूर राहावे,
4. खोकतांना- शिंकतांना तोंडाला रुमाल लावावा,
5. भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी,
6. पौष्टिक आहार घ्यावा

तर नागरिकांनी काय टाळावे हे देखील यात स्पष्ट केले आहे. यामध्ये

1. हस्तांदोलन अथवा आलिंगन देण्याचे,
2. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे टाळावे
3. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत असे सांगितले आहे.
4. आजारी असल्यास शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेऊन घरीच विश्रांती घ्यावी,
5. आहारात पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्यावेत .
6. तोंडावर मास्क लावावा.

हा आजार प्राणघातक नाही. योग्य उपचारानंतर दहा दिवसांत रुग्ण बरा होऊ शकतो.

रोग निदान विषाणू तपासणी

याचे प्राथमिक निदान लक्षणांवर आधारित आहे. निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा लागतो.रुग्णाच्या विषाणू तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था" class="mw-redirect">राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही), पुणे व राष्ट्रीय संचारी रोग संस्था (पान अस्तित्त्वात नाही)">राष्ट्रीय संचारी रोग संस्था ("नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस'-एनआयसीडी), दिल्ली येथे प्रयोगशाळा तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे. उपचार
कोणत्याही खासगी वैद्यकांना, खासगी डॉक्टरांना अथवा खासगी रूग्णालयांना उपचार देण्याची क्षमता नसून परवानगी नाही आहे.उपचार केवळ राज्य स्वाईन फ्ल्यू नियंत्रण कक्ष">मान्यता प्राप्त शासकीय रूग्णालयातच उपलब्ध आहे आणि तसा तो शासकीय रूग्णालयातूनच घेणे बंधनकारक आहे।

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

राज्यात वेगाने ‘ स्वाईन फ्लू ’ पसरत आहे. त्यामुळे जास्त लक्षणेआढळल्यास वैद्यकीय अहवालयेण्याआधीच संशयित ‘ स्वाईन फ्लू ’ पेशंटला टॅमिफ्लू औषधाच्या गोळ्यादेण्यात येणार आहेत. राज्याच्याआरोग्य विभागाने सगळ्या ‘ स्वाईनफ्लू ’ उपचार केंद्रांना तशा सूचनादिल्या आहेत. या वृत्ताला ससूनहॉस्पिटलचे डीन डॉ. जामकर यांनीदुजोरा दिला आहे.

ताप, सर्दी, खोकला, उलट्या होणेआदी लक्षणे आढळल्यावर रुग्णतपासणीसाठी येतात. त्यानंतरत्यांच्या नाक आणि घशातील द्रवपदार्थ पुण्याच्या राष्ट्रीय विषाणूसंस्थेत (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉरव्हायरॉलॉजी अर्थात एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवण्यात येतो. संस्थेचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यासटॅमिफ्लू देऊन उपचार करण्यातयेतात. मात्र या पद्धतीने उपचार सुरूहोण्याआधीच तब्येत खूपखालावल्यामुळे औषधे देऊनही विशेषफरक पडला नाही आणि राज्याततिघांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवरजास्त लक्षणे आढळल्यास वैद्यकीयअहवाल येण्याआधीच संशयित ‘ स्वाईन फ्लू ’ पेशंटला टॅमिफ्लूऔषधाच्या गोळ्या देण्याचा निर्णयघेण्यात आला आहे.

उपचार पद्धतीतल्या या किरकोळ पणअतिशय महत्त्वाच्या बदलामुळे अनेकपेशंट लवकर बरे होतील, असे विश्वास ‘ स्वाईन फ्लू ’ वरु उपचार करणारेडॉक्टर व्यक्त करत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------
आजपर्यंत बर्ड फ्लु ऐकलं होतं. मॅड काउ पण ऐकलं होतं . आता हा अजुन एक नविन प्रकार दिसतोय..

नावावरुन तर तो चक्क डुकरांच्यामुळे होणारा ( म्हणजे पाकिस्तान्यांच्या मुळे नाही) रोग वाटतो.खरं तर हा फ्लु डुकरांच्या मधे अगदी कॉमन आहे. अमेरिकेत डुकरं पाळणं (खाण्यासाठी) हा एक मुख्य धंदा आहे. अगदी आपल्या इथे ज्या प्रमाणे पोल्ट्रीज आहेत तशात तिथे पिगरीज आहेत. सॉसेजेस हा तिथला आवडता पदार्थ.आत्ता पर्यंत डुकरांना पाळतांना देण्यात येणारे व्हॅसिन्स योग्य रितिने रोगाला अटकाव करित होते. पण आता मात्र व्हायरस अजिबात दाद देइनासा झालाय, त्या व्हॅसिन्स ला. डुकरांच्या सान्निध्यात काम करणाऱ्या लोकांना पण हा रोग होऊ शकतो.

२००४ मधे युनिव्हर्सिटी ऑफ लोवा मधे एका सर्विलन्स स्टडी मधे हे सिध्द खालं होतं की , जे लोकं पोल्ट्री आणि स्वाइनरी हॅंडल करतात त्यांना झोनोटीक इन्फेक्शन विथ इन्फ्लुएन्झा व्हायरस होऊ शकतं .तसा, सहजा सहजी हा रोग माणसांना होत नाही, पण एकदा झाला की मग मात्र फार वेगाने स्प्रेड होऊ शकतो.

१९७६, नंतर १९८८ नंतर आताच २००९ मधे ह्या व्हायरसने पुन्हा डोके वर काढले .आताच्या या अटॅक मधे १७२ डेथ मेक्सिको मधे आणि २० डेथ आणि १००० च्या वर इन्फेक्शन्स झालेले आहेत.

कांही दिवसांपुर्वी एक लेख वाचला होता कृष्ण उवाच मधे सामंत साहेबांचा. त्यात त्यांनी म्हंटलं होतं की अमेरिकेत रहाणाऱ्या भारतियांनी विनाकारण अमेरिकन्सचं अंधानुकरण करु नये. बिफ, पोर्क, बेकन्स खाणं टाळावं. आजच्या परिस्थितित तेच अगदी संयुक्तिक वाटतं. बेकन कींवा पोर्क खाण्यामुळे पण हा रोग होऊ शकतो असे कांही लोकांचे म्हणणे आहे पण कांही डॉक्टर्स म्हणतात की वेल कुक्ड फुड खाल्लं तर कांही धोका नाही.

याचे सिंपटम्स पण अगदी आपल्या नेहेमीच्या फ्लु सारखेच असतात. गळणारं नाक,घशातली खवं खवं ताप, थकवा, भुक न लागणं, खोकला, उलट्या आणि डीसेंट्री, त्यामुळे ह्या रोगाला इतर रोगांपासुन वेगळं आयडॆंटीफाय करणं पण तसं कठिणंच. तरीही अमेरिकेत डॉक्टर्सना सांगण्यात आलेलं आहेतुमच्या कडे कुठलिही व्हायरल इन्फेक्शन ची केस किंवा रिस्पायरेटरी इन्फेक्शन ची केस आली तर “स्वाइन व्हायरस” टेस्ट करा म्हणजे हा रोग पसरणे थांबण्यास मदत होईल..

हे कळतं कसं ? किंवा हे कन्फर्म कसं केलं जातं की एखाद्याला स्वाइन फ्लु आहे म्हणुन? तर नाकातलं फ्लुड आणी कफ यांच्यावरपॅथॅलॉजिकल टेस्ट्स केल्या की मग कळतं स्वाइन फ्लु आहे की नाही ते.

हा डीसिझ कॉंटेंजिनियस आहे. खोकल्यामुळे प्रसारित होणारे जर्म्स मुळे हा रोग पसरु शकतो. शक्यतोवर हा रोग झालेल्या माणसाबरोबर शेक हॅंड केल्यास साबणाने हात धुणे अतिआवश्यक आहे. हा रोग शिंकांमुळे पण पसरु शकतो. एखाद्या माणसाला हा फ्लु झाला तर तो सहाजिकच खोकला आल्यावर तोंडासमोर हात धरेल आणि मगच खोकेल. कींवा शिंक आली तरी पण तो नाकासमोर हात धरेल. असे करण्यामूळे रोगाचे जर्म्स हातावर ट्रान्स्फर हौऊन नंतर मग लॅपटॉप्स, टेलिफोन्स, टेबलटॉप्स वर हा व्हायरस फ्लोट होतो. इथुन हा डोळॆ, नाक, किंवा तोंडावाटे दुसऱ्याच्या शरिरात प्रवेश करु शकतो.

अल्कोहल बेस्ड जेल्स, किंवा फोम वापरला तर ह्या व्हायरस पासुन बचाव होऊ शकतो. शोशल डीस्टंन्सिंग ही एक दुसरी साधी पध्दत पण व्हायरस दुर ठेवण्यास मदत करु शकते. डब्लु एच ओ ने गाइडलान्स मधे सांगितलंय की ज्याला फ्लु लाइक सिम्पटम्स असतिल त्याने हा फ्लु स्वाइन फ्लु नाही, हे कन्फर्म होई पर्यंत इतरांपासुन दुरच रहावे.

अमेरिकेत सध्या टॅमिफ्लु किंवा रेलेन्झा हे ड्रग्ज प्रिव्हेंटिव्ह म्हणुन दिले जातात.भारत, आणि इतर एशियाई देशात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन येणाऱ्या प्रवाशांची टेस्ट करणे सुरु केले आहे. अगदी ह्याच प्रकारच्या ऍक्शन्स बॅंकॉक मधे पण घेण्यात आल्या आहेत. बॅंकॉक मधे तर फॉरिनर्स ला परत पाठवा असाही प्रस्ताव आहे.

आता हा रोग कधी आटोक्यात येइल ते काळच ठरवेल.
http://kayvatelte.wordpress.com/